Posts

Showing posts from 2016

।। भटकंतीची पूर्व तयारी ।।

Image
।। भटकंतीची पूर्व तयारी ।।                                               प्रागैतिहासिक काळात शेतीचा शोध लागला आणि माणूस भटकंती सोडून स्थिर झाला, पण प्रगत काळात मानवाला पुन्हा भटकंतीचे वेध लागले. या मधल्या काळात भटकंती या विषयामध्येही बरीच स्थित्यंतरे झाली व भटकंती किंबहुना ट्रेकिंग हा शब्द परवलीचा झाला किंवा हा एक छंद म्हणून नावारूपास आला. निसर्गापासून दूर गेलेला मानव या निमित्ताने पुन्हा निसर्गाकडे वाळू लागला, यातून आनंद मिळवू लागला. आता भटकंती करणे म्हणजे डोंगर, दऱ्या, पर्वत, नदी, नाले ,गावे, शहरे, विविध ठिकाणे, प्रांत सर्व सर्व आले. पैकी आपण शहरी किवा ग्रामिण जीवनास रुळलेली मंडळी तेव्हा इतर ठिकाणी भटकायचे तर काही नियम पूर्वतयारी मर्यादा यांचे हि अवलोकन हवे. नाहीतर आनंदावर विरजण पडू शकते ना! तर इथं आपण भटकंतीची पूर्वतयारी या विषयावर व फक्त याच विषयावर बघणार आहोत.                             आता इथेही भटक्यांचे २ भाग पडतात पहिला भटकंतीतून इतिहासाकडे वाळलेले तर दुसरं इतिहासातून भटकंतीकडे वाळलेले किंवा इतिहासाच्या शोधात भटकंती करणारे म्हटलं तरी चालेल या इतिहास भ

झपाटलेला ट्रेक

Image
झपाटलेला ट्रेक  जून चा पहिला आठवडा चालू होता. उन्हाळा संपून आता पावसाळा सुरु होणार होता.  तसे बदलही वातावरणात जाणवत होते. नुकतेच मला वरिष्ठानी नोकरीच्या बंधनातून मुक्त केल्यामुळे वेळ च वेळ होता. भटकायची जणू पर्वणीच. २ दिवस  मस्त सह्याद्रीत व्यथित करायचे मनसुबे आखले गेले. डोंगर रंग ठरली. तैलबैला-सवाष्णी घाट- धोंडसे मार्गे सुधागड. ठरलं. जोडीला कोणी मिळालंच नाही, म्हणून नियोजनात बदल नाही.          शनिवारी सकाळी सकाळीच मुंबईहुन तैलबैला कडे निघालो, गाडी भांबुर्डयाची होती तिकीट काढताना मूड बदलला  व सरळ घनगड ला गेलो. दुपारी घनगडावरून समोर सुधागड पाहत न्याहारी सोडली तर उजवीकडे तैलबैला रात्री मुक्कामाला खुणावत जो मुक्काम सुधागडावर होता. संध्याकाळी तैलबैला गावात मुक्काम करून सकाळी निवांत पणे सवाष्णीकडे निघाल. मळभ भरून आलेले. एकटाच भटकत होतो भुतासारखा रानोमाळ.  घाट उतरणीला जरा एका झाडाखाली गार सावलीला बसलो. १० मिनिटासाठी आडवा झालो न तब्बल २ तासांनी उठलो. भयंकर गाढ झोप. दचकून उठलो घड्याळ पाहिलं ३ वाजलेले, वातावरणात एक प्रकारची अस्वस्थता जाणवत होती. माझी होती कि वातावरणाची माहिती नाही. उरलेला घ

दुर्गमदुर्गवनदुर्ग किल्ले गुमतारा

Image
दुर्गमदुर्गवनदुर्ग किल्ले गुमतारा      जुलै मधील  एक रविवार, बाहेर मुसळधार पाऊस चालूय, गाडी काढून कुठेतरी नवीन ठिकाणी जाण्याचे वेध लागलेत. साम्याने उत्तर कोकणातील एक मजबूत किल्ला सुचवला , उत्तर कोकणात जायचे तर प्रचंड रहदारीचा सामना व त्यामध्ये पाऊस तर आणखी मंद गतीचा प्रवास. इति- योगेश आलेकरी.  पश्चिम-मध्य महाराष्ट्राकडे माझा कल. अखेर सरतेसमयी सम्याच्या म्हणण्याप्रमाणं उत्तर पश्चिम किनारपट्टीवर लक्ष ठेऊन असलेला एक भक्कम डोंगरी किल्ला निश्चित झाला व आम्ही निवांत पणे गाडी हाकत निघालो नवी मुंबई - ठाणे - घोडबंदर - संजय गांधी अभयारण्यातून पलीकडे पश्चिम द्रुतगती मार्गावर आलो.       एका प्रतिष्ठित लेखकाचे पुस्तक सोबतीला होते त्यातील चुकीच्या नकाशानुसार चुकीच्या फाट्यावर गेलो. स्थानिकांकडून योग्य माहिती मिळाली किल्ल्याकडे जाण्यासाठी, पण तोपर्यंत ४० किमी विनाकारणच भरकटणे झालेले. पुस्तकात दिलेला रस्ते मार्ग चुकीचा निघाला पण ट्रेन ने जाण्यासाठी दिलेला योग्य ,जो कि आमच्या कामाचा नव्हता. शोधमोहिमेत या पाऊसामुळे वैतागलो होतोच . शिरसाट फाट्यावर उभे होतो बाजूलाच एक हॉटेलवाला मस्त कांदा भजी काढत ह

दुर्गराज ते दुर्गदुर्गेश्वरमार्गे अग्याची नाळ - एक थरारक प्रवास

Image
राजगड ते  रायगड मार्गे अग्याची नाळ.                                           - एक थरारक प्रवास.  खूप  दिवसापासूनची इच्छा पूर्ण होणार होती, राजगड ते रायगड हा ट्रेक पूर्णत्वास जातोय. तारीख ठरली १-२-३ ऑक्टो.  प्रचंड उत्सुकता होती उत्साह शिगेला पोहोचला होता. मानसिक शारीरक तयारीही झाली होती, फक्त राजगड ते रायगड बाकी होत.              ओंकार नायगांवकर या उस्मानाबाद च्या अवलियाच्या प्रयत्नातून खर तर हा योग जुळून आला होता. ३ महिने आधीच ग्रुप तयार झाला चिक्कार भरणा झाला, नियोजन झाले, राजगडच्या पायथ्याशी पाली गावात नाना धुमाळ देशमुख यांच्या घरी भेटण्याचे नक्की झाले. २३ उत्साही तरुण प्रत्यक्ष सहभागी झाले. यामध्ये मुंबईतून मी, रवि दादा, समीर शिर्के, पार्टे व अमित तर पुण्यातून राहुल बुलेबुले व सहकारी. उस्मानाबाद वरून ओंकार दादा, शैलेशदादा, रोहित आदी. तर कोल्हापूर वरून सुनील अडसुळे व सहकारी अशी विविध ठिकाणांवरून मांदियाळी जमली.   हां. . . तर आमचे (मुंबईकर्स) चे adveture पनवेल पासून च सुरु झालेले, १:३७ ला स्वारगेट ला उतरलो. ६:३० ची बस होती निवांत झोपायचं होत पण मच्छरानी त्यावर पाणी  फेरले. मग