Wednesday, 13 January 2016

अपरिचित अदगाव बीच

अपरिचित अदगाव बीच.
मनुष्याला पर्यटनाची हौस भारी !! अलीकडच्या काळात माणसाचा मानसिक त्रास वाढला व त्याला अनुसरून पर्यटन पण वाढले . पण आपण पर्यटनावर का निघतो ??रोजच्या धावपळीतून, सिमेंटच्या जंगलातून , बजबजपुरीतून , गर्दीतून बाहेर पडून शांततेचे एकांताचे क्षण शोधायलाच ना ? पण आपण जातो तिथे तर एवढे पर्यटन जोमात असते कि वाटते गाड्या आपली ती मुंबापुरी बरी !!! ;) त्यावर उपाय म्हणजे अलीकडेच बहरास येत असलेले ग्रामीण पर्यटन, काही अपरिचित किनारे, दुर्गम भागातील गडकिल्ल्यांच्या पायथ्याची खेडी हे चांगले पर्याय ठरू शकतात. असाच परवा एका अपरिचित ठिकाणी जाण्याचा योग आला त्याबद्दल जरासं…
सूर्यास्त

अस्ताला जाणारा सुर्य टिपताना
         अदगाव चौपाटी एक नितांत सुंदर ठिकाण. विस्तीर्ण समुद्र किनारा, छोटास गाव, नारळी-फोफळीच्या बागांनी वेढलेलं टिपिकल कोकणी बाज असलेले हे गाव दिवेआगर पासून १० किमी उत्तरेला आहे. मी व संतोष दोघेच बाईक वरून निघालो, मुंबई पासून व पुण्यापासून २०० किमी अंतर. सारथ्य संतोष कडे दिल्याने मी मागे निवांत होतो. त्याचाच फायदा म्हणजे रातोडी गाव च्या हद्दीत रस्त्याचे काम चालल्याने काही विरगळी खोदुन  वरती एका रांगेत ठेवलेल्या दिसल्या, जर वेगळ्या धाटणीची ती शिल्पे पाहून माणगाव, म्हसळा मार्गे वेलास ला थेट समुद्र किनाऱ्यावरच अवतरलो. इथून अदगाव पर्यंत चा प्रवास  भलताच मजेदार !! अगदी किनाऱ्याला लागून च रस्ता, इतका कि , घसरला तरी थेट समुद्रातच पडावा. : D एका बाजूला अथांग सागर तर दुसऱ्या  बाजूला बुटकी च डोंगररंग  असा नजर नजारा डोळ्यात भरून घेत असतानाच अदगावचा किनारा  लागला. गाव अगदी किनाऱ्याला खेटूनच !! सुदेश मोरे दादा यांच्याशी आधीच संपर्क झाल्याने गावात जाताच  झाली.  लगेच एका प्रशस्त घरात आमची केली व फ्रेश होऊन पाठीमागच्या  घरी   जेवायला गेलो. वहिनीनी अगदी  उत्तम प्रकारे घरगुती पद्धतीचे ते टिपिकल कोकणी चवीचे शकाहारी मांसाहारी दोन्ही. त्यावर येथेच्छ तांव मारून सोलकढी  पिउन बाहेर पायरीवर बसलो.
दुपारचा समुद्र
समोर अथांग समुद्र, मागे नारळीच्या-सुपारीच्या झापाची सळसळ  मध्येच एखाद्या लाटेचा धस्सकन आवाज यांची छान जुगलबंदी ऐकत असतानाच कुठूनतरी पक्ष्यांचे मनमोहक आवाज कानी यायचे. एक मस्त कोकणातील शांत दुपार अनुभवत होतपहुडलेला गांव, बाजूला पारावर एक आजोबा काहीतरी वचनात गुंग, समोर समुद्र त्याच्या धीर-गंभीर लाटांमध्ये व्यस्त, मध्येच विद्युत वेगाने  झडप घालून  पकडण्यासाठी समुद्री पक्ष्याची  लगबग,वाऱ्याची मंद झुळूक  अशा वातावरणात हरवून जात असतानाच ५ वाजले  व आम्ही मस्त आल्याचा चहा घेऊन समोरच्या गोठण्याच्या डोंगरावर सूर्योदय पाहायला  चालते झालो, वाटेत ग्रामदैवत कुंभळंजा देवीचे दर्शन घेऊन परतलो. संध्याकाळ झाल्याने मासेमारीच्या बोटी किनाऱ्यावर परतत होत्या काही नांगरलेल्या उगचच हेलकावे  होत्या.
जेवणाची  होइपर्यन्त  आणखी काहीतरी घ्याव सागराकडून म्हणून गाडी काढली व थेट वेळासच्या किनाऱ्यावर  झालो तेथील  पुलावर पाय सोडून मस्त गप्पा मारत बसलो एकादशीची रात्र असल्याने काळोखाच फार, दूरवर समुद्रात बोटीवरील lights एखाद्या छोट्या गावाप्रमाणेच भासत होत्या, बाकी वातावरण एकदम  होते. ९ वाजले  मात्र पोटातून भुकेचे संकेत यायला लागले, तस कोकणात आले कि जिभेला चांगलाच चोचल्याच भरते आलेले असते :p वहिनीनी मस्त शाकाहारी व मांसाहारी अस दोन्ही प्रकारचा  होता, आता वर्णन करून तुमच्या भावना चाळवत नाही. पण  जिभेचे चोचले पुरवायला २ दिवस वरचेवर यायचेच अस ठरवूनच  आटोपला.
पुन्हा रिकामा वेळ!! किनाऱ्यावरच गाव  घरात कोणाला बसवतय ? जेवलो कि शतपावली किनाऱ्यावरच !! तोपर्यंत दादांनी मस्त शेकोटी पेटवली.
किनाऱ्यावरील शेकोटी
थंडगार वाळूत, गार गार समुद्रावरून आलेल्या वाऱ्याला  शेकोटीच्या जोरावर थोपवले होते… साग्रासंगीताचा मंजूळ आवाजात बाजूच्या नारळी-फोफळीच्या झापांची सळसळ सुरांत सूर मिसळत होते,  दूरवर कुठेतरी एखादे कुत्रे केकातून आपलेही अस्तित्व त्या निरव शांततेत दाखून  देत होत होते. भलताच गोड अनुभव होता हा. बराच वेळ शेकोटी बाजूला गार वाऱ्यात वाळूवर पडून होतो,
संतोष
 शेकोटी विजली न थंडीने आपले अस्तित्व जाणवून दिले  मग सपशेल माघार नोंदवून आम्ही घरी जाऊन बिछाना जवळ केला पण खिडकीतून ऐकू येणारे लाटांचे आवाज स्वप्नातही  लागले होतेच.
६:१५ संत्या bc ने उठवले इच्छा नव्हतीच पण सूर्योदयाच्या लोभाने उठलो ते कॅमेरा घेऊन तडक किनाऱ्यावरच….
कातरवेळ फेरफटका
नुकताच उजाडत चालले चालले होते, शांत निखळ सागरावर एक लकाकी आली होती. समुद्रात घुसलेल्या एका डोंगर सोंडेवर जाऊन पूर्वेकडे डोळे लाऊन बसलो तब्बल ४७ मिनिटे वाट पाहायला लाऊन रविराज ७:१८ ला अवतरले तेच मुळी कोकणचे सौंदर्य लेऊन !!!
आणि रविराज ने दर्शन दिले एकदाचे
सूर्योदयाची येथेच्छ फोटोग्राफी करून लगेचच समुद्रात जलतरणाच्या कार्यक्रमावर रुजू झालो. दीड किमी लांबीच्या त्या स्वच्छ सुंदर किनाऱ्यावर आमचा फोटो काढायला सुध्दा कोणी भेटणारनाही याची खात्री
असल्याने घरातून च एक स्टूल as अ  tripod म्हणून घेऊन गेलो होतोच.
जलतरणाचा कार्यक्रम

सेटप ! स्टूल एज अ ट्रायपोड
मनसोक्त पोहून फोटोग्राफी करून गरमागरम पोहे ओले खोबरे टाकून खाल्ले व निघालो कोळीवाड्यात मच्छी लिलाव पाहायला हे सर्व मला नवीनच असल्याने भारी कुतूहल होत बाकी. सुदेशदादांनी हे सर्व माहित करून दिल्याबद्दल  त्यांचा. वेगवेगळ्या  प्रकारचे मासे येत होते ते तसेच कोणीतरी घेऊन जात होते.
माशांची आवक
बोली लागली

एका मात्स्याजीवाची भावमुद्र
आता  सटकलो व mission अदगाव दर्शन वर निघालो दादांनी सर्व गाव फिरून दाखवला मजा  आली. वेगवेगळी माणसे भेटत गेली घरे भेटत गेली . पूर्ण गाव हिंडलो नारळी फोफाळीच्या बागा पहिल्या , काजू, हापूस च्या बागा पहिल्या, एके ठिकाणी मस्त बोरे खायला मिळाली.
नारळी फोफळी च्या बागेतून फिरून माहिती घेताना
मग घरी आलो तर बाहेरील नारळाच्या झाडावर लागलेलेशहाळे खुणाऊ लागलेलेच, मग स्वताच त्या उंचपुऱ्या माडावर चढाई करून ५/६ नारळ काढले. कोकणात जाऊन स्वतः नारळ काढून खाण्याची मजाच न्यारी हो !!
लैच मोठा झाड

कसरत

शहाळे काढून त्यासोबत स्वतः ब्लॉग लेखक
१२:३० झाले भूक हि नव्हती …मग ठरल कि जवळच दिवेआगार बीच वर जाऊन येऊ, एव्हाना गाडी दिवेआगार रस्त्याला लागली सुध्दा. मनसोक्त कॅमेरा चालवून जेवायला २:३० ला आलो सुद्धा .
दिवेआगरात संतोषची एक प्रतिमा
दिवेआगार च्या चौपाटीवर फोटोसेशन

आता पुन्हा एकदा दणकून जेवायचं आणि मुंबईकडे रवाना व्हायचा एवढच टास्क बाकी होता.  सोल्लिड जेवण झाल होत. वाहिनी नंबर एकच्या सुगरण त्यामुळे कोकणात food travelling चा बेत असेल तर  हरकत नाही ! टिपिकल कोकणी पद्धतीचे घरगुती शकाहारी मांसाहारी तसेच विविध प्रकारचे मासे विविध प्रकारे बनिविण्याचे वहिनींचे कसब वाखाणण्याजोगेच !
नमुना
आता वेळ होती  निरोपाची ३ ला निघालो घाईतच दिघी बंदरात येउन दिघी क्वीन मध्ये गाडीसाहीतच घुसलो व खाडी उल्लन्घानास सज्ज झालो.
दिघी क्वीन या बोटीचा प्रवास
दिघी क्वीन च्या डेक वरून
आगरदांडा आले तिथून उजव्या बाजूला भली मोठी मिठागरे ठेऊनझाडा झुडुपातून वळणा वळणाचा रस्ता संपवत रोह्यात आलो आता वाकण पाली खोपोली मुंबई एवढ पार झाल कि दौरा आटोपला.
योगेश आलेकरी ;)

संतोष जुगदर
तर एका अपरिचित ठिकाणी जाऊन प्रसन्न वातावरणात, शांत, किनाऱ्यावर, निवांत क्षण अनुभवून आलो होतो. एक मस्त अनुभव घेण्यासाठी आडगाव ला भेट द्यायलाच हवी, सुदेश दादा हे आपली उत्तम प्रकारे सोय करतीलच.  .
वाच्य संयमाबद्दल आभारी :)

Tuesday, 1 December 2015

कोकणात बहरतय ग्रामीण पर्यटन.

 कोकणात बहरतय ग्रामीण पर्यटन. 

कोकण म्हटलं कि डोळ्यासमोर येतात उंचच माडाची बने, दूरवर पासारलेला अथांग समुद्र, शुभ्र किनारे, चौपाट्या,मग  त्यासोबत नितांत सुंदर अशा किनार्यांवर पर्यटकांची रेलचेल, विक्रेत्यांची भाऊगर्दी अगदी नेहमीसारखाच. मुंबईतील धावपळीतून कुठेतरी दोन दिवस शांततेसाठी आपण नेहमीच कोकणाला पसंती देतो. पण जर वरील सर्व अनुभवायचे असेल पण गर्दी नको असेल तर कोकणातील  ग्रामीण पर्यटन ठिकाणाशिवाय पर्याय नाही .तेही अपरिचित अशा ठिकाणी असेल तर मस्तच .
सूर्यास्त 

 Rayari kinara  कडून अशाच एका ठिकाणी जाणे झाले. दिघी बंदराच्या दक्षिणेला ७ किमी वर असलेल्या सार्वा या गावी. एका बाजूला समुद्र व एका बाजूला घनदाट अरण्याने गजबजलेली डोंगररांगेच्या किंचितश्या उतारावर एकमेकांना खेटून, कौलारू  पण पारंपारिक कोकणचे दर्शन घडवणारी टुमदार घरे दिसतात गाव संपताच पायथ्याला समुद्र. अशा निसर्ग सुंदर ठिकाणी सार्वा गाव वसले आहे. ७०/८० घरांची वस्ती पण एकही कोळीबांधव नसल्याने व्यावसायिक मासेमारी होत नसल्याने साहजिकच माशांच्या दर्पापासून मुक्ती मिळते.    मुंबई पासून अंदाजे २०० किमी वर असलेले या गावी  मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव वरून म्हसला मार्गे जाते येते. दुसरा मार्ग रोह्यातून केळघर घाटमार्गे राजपुरी आगरदांडा जेट्टी वरूनगाडी बोटीत टाकून  दिघी बंदर असा प्रवास  करत सायंकाळी सार्वा गावात पोहोचलो. गाडीची हि समुद्रउल्लंघनाची  पहिलीच वेळ असल्याने याच मार्गाची उत्सुकता  होतीच.
बोटीत आमची गाडी चढवताना 
साबिरकाका वाट पाहत होतेच, एक  डोंगररांग उतरून गावात  प्रवेश केला,ते थेट काकांच्या घरीच गेलो. त्याचं घर हेच आमच मुक्कामाच ठिकाण आहे समजल्यावर तर आमच्या  हरिणाचा उत्साह संचारला, कारणही तसच; अगदीच किनार्याला खेटून असं त्याचं घर इतकं कि, लाटांचे शिंतोडे अंगावर  
 घेत ओसरीवर बसून चहा पिता यावा ! समोर अथांग समुद्र, अस्ताला जाणारा सुर्य, निळ्याशार सागरावर आकाशात भगवी छटा पसरवून सुर्यनारायण आकाशातच बुडाले होते . पाठीमागे नारळी फोफळी चे उंचच उंच वृक्ष , दूरवर काही सागरालाच समांतर होऊन आकाशात झेपावलेले. असा तो सुन्दर देखावा पाहत पाऊले कधी किनाऱ्यावरील  वाळूत भटकायला गेली कळलच नाही. सूर्यास्त कॅमेराबद्ध करत असतानाच काका चहा घेऊन आले , तो वाफाळलेला चहा पीत आयुष्यातील एक सुरेख संध्याकाळ अनुभवत होतो. बराच वेळ किनार्यावर च होतो , मी, प्रशांत अन सोबतीला साबीर काका.काका त्या परिसराबद्दल भरभरून बोलत होते, तेथील जन्जीवानाबद्दल बोलत होते. त्यांनी तेथे फ्री फिशिंग (हाताने मासे पकडणे) हि दाखवले. तोपर्यंत रात्रीच जेवण तयार झाले होते, काकुनी मस्त अस्सल कोकणी पद्धतीचे जेवण बनवलेले त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय. 
संध्याकाळीचे काही क्षण 
फेरफटका . ओहोटीला गेलेल्या समुद्रावरून 


साबीर काका तेथील परिसराची माहिती देत होते 

जेवण आटोपून बाहेर पडलो,  मस्त चंदेरी लाटांचा आस्वाद घेण्यासाठी चंद्राच्या उजेडात किनाऱ्यावरील वाळूत अनवाणी पायाने चालत फेऱ्या मारत असतानाच चांदणे ओंजळीत घेण्याचा प्रयत्न करावा आणि क्षणार्धात फेसाळती लाट  पायावरून जात बाजूला च दगडावर अडलावी न आपण भानावर यावे, असाच काहीसं होत होत. बराच वेळ बोचरी थंडी अंगावर घेत दूरवर समुद्रात होणार्या हालचाली न्याहाळत बसलो. एखादे शहर भासावे तसे त्य जहाजावरिल दिव्यांनी समुद्र चमचमत होता. दिघी बंदरात येण्यासाठी नांगरलेली ती जहाजे होती. १० च्या दरम्यान घरी आलो  काकांनी झोपायची उत्तम सोय केलेलीच होतीच. खिडकीतून दिसणारा अथांग सागर व लाटांची लयबद्ध गुंज कानावर घेत कधीतरी निद्राधीन झालो. 
काकांच्या घरातील आमची झोपेची व्यवस्था 


मी व प्रशांत 

सकाळी उठलो ते थेट किनाऱ्यावरच धावलो प्रशांतने कॅमेरा घेतलेलाच सोबत, चमचमणारे सूर्यबिंब ओहोटीमधील डबक्यामधून डोकावत होते, पाठीमागील डोंगरांतून सूर्योदय होत होता, माडाच्या झापामधून सुर्कीर्नाच्या होणारा शिडकाव भलताच गोड भासत होता. आन्हिक आवरून पुन्हा वाळूत येउन बसून नारळीच्या झापामधून डोकावणारी कोवळी सूर्यकिरणे अंगावर घेत हातात  चहा बिस्कीट व सोबतीला समुद्रच सागर संगीत .…!!!!!
सक्काळी सक्काळी 

आता वेळ होती site seeing ची सार्वा गावाच्या मागच्या बाजूला जी डोंगररंग आहे त्यामध्ये एक धबधबा आहे, साधारण ५०/६० फुटाचा तो धबधबा साधारण जानेवारी पर्यंत वाहता असतो, अर्ध्या तासाच्या जंगल ट्रेक करून आपण थेट धाब्धब्यापाशी पोहचू शकतो. पूर्ण पणे सुरक्षित असा तो धबधबा family trip साठी छान पर्याय आहे.
धबधब्यावर

इथून आजूबाजूला घनदाट जंगल तर समोर नारळीच्या बागेवरून थेट समुद्राचे दर्शन. मनसोक्त photography करून न्याहारीसाठी घरी येत असता वाटेत एक माडाचे बन लागले नारळाच्या उंचच उंच  झाडावर लगडलेले शहाळे पाहून तोंडाला पाणी सुटले ना !! मग काय free  climbing चा अनुभव कमी आला ना. सरसर झाडावर चढून तीन मोठे शहाळे काढले. न्घारी जाऊन मग मस्त प्रोग्राम ;) कोकणात जाऊन शहाळे पिणे तेही स्वत झाडावर चढून काढलेले वाहः मजा काही निराळीच !! 
झाडावरून शहाळे काढताना 
चढायची कसरत 

आणि काढलेल्या शहाळे हातात घेऊन स्वतः ब्लोग लेखक 
  आता वेळ होती मणेरी येथील प्रसिद्ध light house दिप गृह पहायची. रस्ता किनाऱ्यावरूनच चालला होता बाजूलाच एक तले शाबीर काकांनी दाखवले तेथे मस्तपोहण्याची सोय होऊ शकते. नानावली गावात गाडी पार्क करून मणेरीकडे चालतच जाव लागते. डोंगराची एक निमुळती सोंड सरळ समुद्रात घुसलेली आहे त्यावर अगदी टोकाला तटरक्षक व बंदर (port)  यांचे एक ठाणे आहे त्यावरच दीप गृह आहे ते ,अर्ध्या तासात च आपण तिथे पोहचतो. हे light house जहाजांना दिशादर्शकाचे महत्वाचे  काम या ठिकाणावरून पार पडले जाते. संरक्षणाच्या दृष्टीने संवेदनशील असल्याने छायाचित्रणावर मर्यादा देऊन ते दीपगृह आतून पाहण्याची संधी मिळाली.
मणेरीचा दीप गृह दुरूनच 
दीपगृह watch tower म्हणून हि काम पाहतो यावरून दूर दूर वर पसरलेला समुद्र दिसत होता, दिघी बंदरात येणारी व नागरलेली जहाजे दिसत होति. उजवीकडे कासा बेटावर शिवरायांनी वसवलेलं पद्मदुर्ग दिसत होता, जंजिरा जरासा डोंगरा आड असल्याने नजरेच्या टप्प्याबाहेर होता. तिथल्या अधिकाऱ्याचे आभार मानून परत नानवली गावात आलो जे आयुर्वेदिक औषधांसाठी ओळखले जाते. तिथून समुद्र दर्शन घेत दुपारच्या जेवणासाठी घरी अलो.
दुपारचे जेवण 
काकुनी मस्त जेवण बनवलेलेच होते येथेच्छ तव मारून काकांचा निरोप घेऊन आडगाव चौपाटी व वेलास चौपाटी कड रवाना झालो ४ किमी असणारी हि चौपटी खर्च या परिसराच्या सौदर्याला ४ चंद लावते. हि चौपाटी म्हणजे एक स्वप्नवत वाटणारासुंदर नजाराच  अर्धचंद्राकृती आकाराचा किनारा, स्वच्छ पाणी ,गर्दी नाही, किंबहुना कोणीच नाही आपल्याशिवाय, निरव शांतता, किनाऱ्यावरील माडाची झाडे समुद्राला समांतर होऊन अचानक  आकाशाला झेपावलेले, त्यावर चाललेली समुद्री पक्षांची किलबिल, लाटांचा लयबद्ध आवाज, आणि आम्ही दोघेच फोटो काढत उभे, एवढी निर्मनुष्यता खचितच मिळते !! सार्वा ट्रीप मध्ये हा बीच चुकूउच  नये असा. "कोकण ,म्हणजे परमेश्वराला पाहते पडलेले सुंदर स्वप्नच" असौगिच नाही कोणी म्हणून ठेवले. 
आदगाव चौपाटी 
एकांतात चौपाटीवर वावर 

इथून पुढे वेळास १० किमी व दिवेआगार चौपाटी १८ किमी वे फक्त. व त्त्याना जोडणारा रस्ता म्हणजे निव्वळ स्वर्गच !!! उजवीकडे अथांग सागराचा लयबद्ध खेळ, तर डावीकडे झाडझूडपाणी वेढलेले बुटके डोंगर, अगदी दोइवरिल टोपी उडाली तरी समुद्रात जाऊन पडावी एवढा जवळून रस्ता . इथून मात्र वेळे अभावी वेळास व दिवेआगर येथील सुवर्णगणेश बघून म्हासला-माणगाव मार्गे मुंबईकडे रवाना झालो. 
काही निवांत क्षण 

   मळलेल्या पायवाटेव्यतिरिक्त आडवाटेवर रमणाऱ्यासाठी सार्वा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो . इथे आपल्यला काय मिळेल पाहायला ? -तर दिघी बंदर., जंजिरा तर अवघ्या १२ किमी वर जवळच पद्मदुर्ग, मणेरी दीपगृह, सार्वा धबधबा हा तर कौटुंबिक सहलीसाठी उत्तम ठिकाण, बाजूलाच सार्वा बीच, अद्गाव बीच, तसेच ग्रामीण जीवन जवळून बघण्यची संधी, किंभ्ना अनुभवण्याची संधी, see foods, साबीर काकांकडे तर माशांचे सर्व प्रकार उत्तमरित्या व चविष्ट  केले जातात  त्यामुळे आपले foodtravel पण होऊन जातेच समुद्रकिनारी टेंट लाऊन साग्रसंगीत ऐकत रात्र घालविण्याची मजाही घेत येऊ शकते. 
या स्थळास भेट द्यायची असल्यास साबीरकाका 7588650329 यांना संपर्क करू शकता .

 
-विशेष आभार- मुग्धा येळकर -

Saturday, 4 July 2015

हरिश्चंद्रगड -नळीच्या वाटेने, साधले घाटाने.

हरिश्चंद्रगड -नळीच्या वाटेने, साधले घाटाने. 
टंक लेखनाविना बरीच हस्तलिखिते पडून होती आज लक्ष गेले न इरीलाच पेटलो…घेतलाना भो टायपायला. ;)
असो,
 सह्याद्रीच्या मुख्य रंगांपासून थोडी वेगळी झालेली हरिश्चंद्र- बालाघाट रांग, यामध्ये असणारा हा गड व तो सर्व भटक्यामध्ये  प्रसिद्ध करणारा सह्याद्रीने प्रसवलेले रौद्र भीषण अस सौदर्य प्रदान झालेला कोकणकडा ,  महाराष्ट्रतील सर्वोच्च शिखरांपैकी एक असे तारामती शिखर. या सर्व गोष्टीं पाहण्याची, जगण्याची एक अनामिक ओढ आंतरिक ओढ इच्छा नसेल असा गिर्यारोहक मिळणार नाही. माझ्याही मानगुटीवर हे भूत होताच कि.!!!! मध्ये मध्ये google map वर satellite mode  ताकाने तहान भागवत होतोच. आणि याच धामधुमीत आबासाहेबांचा मेसेज आला "गडवाट आयोजित हरिश्चंद्रगड"  येतोय का ??? योग जुळला. मी निघालो. !!
            या गडाला बुरुज, तटबंदी, तोफा यासारखी दुर्ग सौदर्याची आभूषणे दिसणार नाहीत पण याचा इतिहास मात्र २००० वर्षापुर्वीपर्यंत घेऊन जातो. राजा हरिश्चंद्र, तारामती, रोहिदास, चांगदेव या ऐतिहासिक लोकांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी या गडाला लाभली आहे.
       गडाचा विस्तार तसा खूप मोठा. त्यामुळे  आपसूकच वाटाही खूप गडाला. खिरेश्वर - टोलार खिंड, पाचनाई या सर्वश्रुत परिचयाच्या पूर्वेकडील तुलनेने सोप्या वाटा पूर्वेकडेच ठेऊन आम्ही पश्चिमेकडील नळीच्या वाटेने जायचा बेत केला व उतरण भरीस भर म्हणून तितकाच अवघड साधले घाटमर्ग. व्वा… !!! मेजवानी तर भन्नाट होती वwhatsapp वर मिटक्या मारता मारता प्रत्याक्ष तव मारण्याचा दिवस आला आणि सुरु झाला एक marathon ट्रेक . माझी तर bike ride  हि Marathon झाली होती कारण हि तसच होत, रात्री १०;३५ सांताक्रूझ मधून  दिप्याची Unicorn घेतली., सांताक्रूझ ते कल्याण या मार्गाचा काहीही गंध नसताना Domestic Airport वरून  जीतुदाला Pickup करून साकीनाक्यावर बापू पवार चा नकार घेऊन, पश्चि- पूर्व उपनगरे पालथी घालत कांजूर-मुलुंड-तीनहात नाका-ठाणे-भिवंडी बायपास- दुर्गाडी-कांदा-लसुन-कल्याण अस करत १२;३० ला कल्याण गाठलं. तिथ आधीपासूनच ताटकळत उभे असलेल्यांनी मी दिसताच क्षणार्धात आपापल्या गाड्या मुरबाडच्या दिशेने फेकल्या, एकूण ७ दुचाक्यांचा आमचा ताफा त्या नगर रोड वर मध्यरात्री सप्तर्षी तारकासमुहाप्रमाणे झळकू लागला,मुरबाडच्या पुढे टोकवडे हा आमचा पहिला थांबा होता, तिथे बस ने आलेल्यांना tripsy घेऊन घेऊन पुढील नियोजित प्रवास होता.
त्या किर्रर्र ज्झादीतून जाणार्या रस्त्यात मध्यरात्रीच्या वेळी भयाण शांतता कापत गाड्या आडव्या तिडव्या झापझुप  करत  मार्गक्रमण चालू होत. या रस्त्याचे वैशिष्ठ म्हणजे कावळा बसायला पण पथ दिवे नाहीत पण ठेचेला गतिरोधके!!याच्या आठवणी जीतुदा च्या मनावर/तनावर चांगल्याच कोरल्या गेलेत ;) असाच एका गतीरोधाकाने मला सरळ कोकणकड्याला जाऊन धड्कल्याची जाणीव करून दिली होती,,,,,असो ,, !!!
आदल्या रात्री कराड-मुंबई प्रवास व आजचा ५ तासाचा यामुळे गलितगात्र झालेला मी मागे तिसरा कोण आहे हेही माहित नवते सिद्धेश होता नंतर कळले . मोरोशीवरून डावीकडे जायचे होते पण झापाझुपगिरीच्या नादात समोरच्याच्या पृच्छदिव्याकडे पाहत सच्या व स्नेहल अगदी माळशेज घाटाला भिडले,आबाने वेळीच मला रोखण्यात यश मिळवल्याने माझा माळशेज घाट हुकला :( तब्बल पाऊन तासाने हि स्वारी चहा मारून परत आली आणि आम्ही शेवटच्या टप्प्यातील ८ किमी चे अंतर पार करून बेल्पद्यातील वेळीवारे या गावी दाखल झालो. तातडीने कामादादाच्या घरी सामसूम झालो.
५;३०ला उठलो, अगदी थंडगार हवेत, सह्याद्रीच्या कुशीत, कोकणकड्याला खेटून वसलेले त्या गावाचे सौंदर्य न्याहाळत असतानाच पूर्वेकडे तांबड फुटू लागल. गावांत झुन्झुमुन्झू झाल, पाखरांची किलबिल, माणसांची शेतावर जायची लगबग पाहत असतानाच अजस्र सह्याशिखारांचा पट हळूहळू उलगडू लागला व लक्षात आले रात्रीच्या त्या किरर्र जंगलातील खाचखळग्याच्या वाटेने आपल्याला सरळ कोकणकड्याच्या पुढ्यातच आणून सोडलाय. तारामतीसह रोहिदास शिखर आपल्या इतर साथीदारांसह आपापली करवतीसारखी शिखरे आकाशात खुपसून निवांत असलेली दिसत होते तर नजर नळीच्या वाटेचा शोध घेत होती पण अजूनही तिने आपली ओळख दाखवली नव्हती. ती वाट कुठेतरी कोकणकड्याच्या डाव्या बाजूला असणार याचे अंदाज बांधतच नाष्टापाणी उरकून प्रतक्ष चढाईला सुरुवात केली हवेतील गारवा, समोरून कोकणकाड्याचे व उजविकडून रोहिदास शिखराचे प्रेरणास्थान याचा एकत्रित परिणाम म्हणून आम्ही जोशातच नदीतील मोठमोठ्या शिळा पार करत किंबहुना उड्या मारतच म्हणा ९ ला नळीच्या वाटेच्या तोंडाला आलो. आघाडीवरून टीम कामादादा तर पिछाडीवरून टीम विठ्ठल नेतृत्व करत होते…!
1. 
आता इथून पुढचा प्रवास खरा नळीच्या वाटेने होता, नळीची वाट म्हणजे काय ???? तर २ कड्यांमधून जाणारी चिंचोळी वाट. उजवीकडे १८०० फुटाचा उभा कोकण कडा तर समोर ३०/४०अंशातून जाणारी उभी चढण तीही जवळ जवळ १००० फुटाची सह्याद्रीमध्ये क्वचितच अशी सलग उभी चढण आढळेल कारण हि वाट कोकणातून सरळ घाटमाथ्यावर जते. इथून पुढे वाट घासार्याची होत जाते, तर चढण खडतर,,,!!


2. सदरहु ब्लोग लेखकाची एक दुर्मिळ छबी 

३.समिर 

४, सिद्धेश 

५. 

६. free climber सुरज 
! काही वेळातच आपण एका प्रस्तारापाशी (Rockpatch )येतो, वाटेतील हे पहिले प्रस्तरारोहण (climbing )इथ २० ते २५ फुटाचे साधे प्रस्ताराहोण करावे लागते, जवळ रस्सी (rope) असावीच,, ! आम्ही मात्र काहीजणांनी मुक्त प्रस्तरारोहणाचा (free climbing) आनंद घेतला, ;) 
सूर्यदेव माथ्यावर येउन आग ओकाण्याच्या तयारीत होतेच त्यामुळे पाण्याच्या बाटल्या खाली करत आपण जवळ जवळ मध्यावर आलेले असतो ,दोन्ही बाजूना प्रचंड उंच कातळ कडे, माकडांनाहि धडकी भरेल असे कोरीव कडे जणू काही आपणास गिळंकृत करतायत कि की अशा अविर्भावात उभे. तर पाठीमागे उजवी नळी जी माकडनळ म्हणून ओळखली जाते. ती अतिप्रचंड अवघड या सदरात येते.  
एका अवघड patch वर रोहिणी 
    नळीची वाट ज्यासाठी प्रसिद्ध आहे तो प्रकार एव्हाना सुरु झालेला असतो (वरीलफोटोतील रोहिणीच्या धडपडीवरून लक्षत येईलच )समोर उभी चढण त्यात मोठ मोठे कडे आपल्याला खिजवायला आ वासून पुढ्यात उभे। !!!! पाय ठेवलेला दगड निसटेल कि हातात पकडलेला  हातात येईल काही नेम नसायचा. जराशी चूक उरत धडकी भरवायची, चूक झालीच तर सरळ जिथून आलो तिकडेच मध्ये आधी थांबा नाहीच !!
             जस जस वर चढू तस एक एक पाऊल आपणास आणखी अवघड वाटेवर आणून ठेवत असे, आणि हाच तो थरार आहे ज्याच भूकेला गिर्यारोहक असतो. ;) 'वाट लागणे' हा वाक्प्रचार या वाटेतूनच प्रसवला असावा असाही विचार मनाला चाटून गेला !! एव्हाना सर्व द्विपाद प्राण्यांनी चातुष्पद्गिरी चालू केलेलीच होती. छायाचित्रकारांची विविध कोनासाठी चाललेली फोटोग्राफी दिसून येत होती. यामध्ये राहूल आघाडीवर होता. 
     इथून पुडे थोड वर आल्यावर वाट दुभंगते व एक उजवीकडे तर एक डावीकडे जाते उजवीकडे वर काहीही दिसत नसल्याने आपण डावीकडे कूच करतो व काही वेलची चढाई कुचकामी ठरून आपण परत उतरतो व उजवीकडे जातो (एक अनुभव )  अ सर्वात अवघड टप्पा अत्यंत अरुंद जागा खाली नजर जाईल तिथेपर्यंत खोल दरी उजवीकडे कातळ कडा तर डावीकडे निव्वळ दगड धोंड्यांची उतरण,

८. दुसरा rockpatch 
अशा या खतरनाक घळीत गिर्यारोहणाचे सर्व कसब पणाला लाऊन चढाई करावी लागते एवढे दिव्य पार करून आपण एका छोट्याच पण अवघड अशा प्रस्तारापाशी येतो रस्सिशिवाय काम होत नाही इथे. एक एक मावळे स सर सर वर चढू लागले (८ न छायाचित्र )खाली रांगेत बसलेले वर चढनार्यांची लटकेगिरी पाहत होते. व स्वताचाही नंबर येणार  हे आठउन आवंढा गिळत असणार नक्कीच !!!!!!
      मी सुरुवातीस चढून आल्याने वरून निवांत पाहण्याची मजा घेत होतो. इथला थरारक गम्मत तर वेगळीच, इथून वर चढून आलेला कार्यकर्ता त्याला नीटसा बसून आराम करायलाही एका अवघड प्रस्तरला वळसा घालून जाव लागते व नळीची वाट कधी विसरणार नाही याची जाणीव ठेवून पलीकडील नाळीत चढून जावे लागायचे, इथ एक मस्त सावली देणार टिकण आहे. इथ आपले बरेचसे कष्ट संपले असे वाटते कारण आपण जवळ जवळ  वर पोहोचलो असतोच. इथे साधले घाटातून आलेली वाट मिळते. व आणखी एक rock patch वाटेत हजर.
9. shevatch tappa 
चिढून चवताळून तो पार करून आता आपण थेट हरिश्चंद्र गडावर पोह्चल्याच्या आनंदात उड्या मारण्याचा मोह आवराव लागतो कारण आणखी १ rockpatch जरास मध्यम श्रेणीचा पण कोकण कड्यावरून खाली आपला देह कुठे पोहचू शकतो हे LIVE दाखवणारा आहे. जिकिरीने ते कार्य उरकले व सरळ कोकण कड्याच्या मुखाशी अवतीर्ण झाल्यासारखं झाल. दूरवर पसरलेलं सह्यमंडळ, ती भव्यदिव्य शिखरे, विराट खोली, खोलगट आकाराचा अंतर्गोल कोकण कडा, चाहु बाजूंची सुप्तावस्थेतील पर्वतराजी … वाह !!!!! निव्वळ अप्रतिम …. !! एवढ सह्याद्रीच सौदर्य पाहायच, अनुभवायचं असेल तर अशा नळीच्या वाटा धुंडाळाव्या लागतातच …
अडवा करून पहा ;)
४ वाजले होते सलग ९ तासांची चढाई झालेली, कड्यावर निशब्द होऊन मन:शांती होईपर्यंत, शांत चित्ताने मंद डोळ्यांनी ते चित्र मन:पटलावर कोरून हरिश्चन्द्रेश्वरच्या मंदिराकडे निघालो. तहान भूक तर विसरली होतीच पण झोपायची जम इच्छा होती. 
       मंदिर परिसर अभ्यास व निरीक्षण हा कार्यक्रम उद्यावर टाकून एका गुहेत जागा मिळवली व पुन्हा डोम्बाच्या मंदिरापाशी एका टेकडीवर मी, सुरज, राहुल, समीर गप्पांत रंगून गेलो इतक्यात जेवण तयार झालेले वृत्त आले. सोबतच रोहिणीनेजेवण  बनवण्यास चिक्कार मदत केल्याच खात्रीलायक वृत्त होत ;) ८ वाजता हा कार्यक्रम आटोपले व त्या duplex गुहेत जे अग्निकुंड  होत त्यामध्येच आग पेटउन त्या तांबड्या पिवळ्या मंद प्रकाशात सचिन, आबासाहेब, देवा, अनिकेत, सुरज, शंकर बापू, जीतुदा,अशा दिग्गजांसोबत वैचारिक जुगलबंदी सुरु झाली. ऐतिहासिक, सामाजिक, भौगोलिक, जातीय-आंतरजातीय, राजकीय, शैक्षणिक तसेच संघटनात्मक विचारप्रवाहिक , बखर-कादंबऱ्या ते दिल्ली निर्भया - आतपासून इतपर्यंत असे एक वैचारिक चर्चासत्र झडल, व त्या चांगदेव गुहेत गपगार झालो … क्रमश ;
       त्या चांगदेव गुहेत झालेली झोप कोणत्याही आलिशान शयनगृह पेक्षा नक्कीच छान होती.पहाटे थंडगार वाऱ्याने जाग आली. संधिप्रकाशत हरिश्चंद्रेश्वर मंदिर उजळून निघाले होते। बाहेर थोड़ा फेरफटका मारला, उत्कृष्ट बांधकाम शैलीमध्ये हरवून गेलो. मध्यभागी शिवलिंग दोन्ही बाजुंना नंदी  एक छोटा  मोठा, पश्चिम बाजूला चांगदेव गुंफासमूह, प्रत्येक गुहेच्या अथवा लेण्याच्या प्रवेशद्वाराखाली अतिशय ठण्ड आशा पिण्याच्या पाण्याचे टाके, दक्षिणेला दोन मंदिरे तिहि खोदीव व् आखीव रेखीव,  या सर्वांच्या उत्तरेकडून केदारेश्वर मंदिर किंवा गुहेकडे जाणारा मार्ग व् मंगळगंगा नदीचे उगमस्थान, अन पूर्वेला या सौंदर्यलेण्यात येण्यासाठी एक बांधीव प्रवेशद्वार. पूर्वेला बरेचश्या दगडी मूर्त्या व् भग्नावस्थेतील शिल्पे, व् तय बाजूला पुष्करणी तलाव तलवाच्या दक्षिण तीराला कही कही बंधिव देवदया आहेत बजुलाच जमिनीखाली आणखी एक गुम्फामूह आहे, या एकंदर परिसरात काही शिलालेख दिसून आले (बहुदा ८ होते) पैकी चाँगदेवगुहेतील शिलालेखावर चांगदेवानी या गुहेत बसून 'तत्वसार' ग्रंथ लिहल्याचा उल्लेख अहे. तर 'नंदतुतस्तसुतुविकटदेउ' हा शिलालेख ७०० वर्षे जूना आहे. पुढे तारामती शिखराच्या उत्तर उतारावर ४ मोठ्या गुहा आहेत त्या गणेशगुम्फ़ा या नावाने ओळखल्या जातात।
       मुख्य  हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या उत्तरेला थोड़े खाली उतरून गेल्यावर वैशिष्ठ्यपुर्ण अशी केदारेश्वराची गुहा  त्यामध्ये साधारण ४ फुट पाण्यात  असणारे शिवलिंग, साधारण ३०*३० फुट प्रचंड सभागृह कृती गुहेत मध्यभागी  शिवलिंग आहे, याला ४ खंबानी  आधार दिलेला दिसतो  पण यातील एकच खांब आपल्या प्रचीनतेची साक्ष देत  उभा आहे.
१० केदारेश्वर 
केदारेश्वर पाहून आपण पुन्हा आलेल्या वतीने वाटेने बालेकिल्याकडे जायचे  शेवटी राहते ते तारामती शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरांपैकी एक. इथून उत्तरेला कळसूबाई, रतनगड ,कात्राबाई खिंड तर तर दक्षिण-पश्चिमेला माळशेज घाट,सिद्धगड, आजोबा, नाणेघाट, इ. चे स्पष्ट दर्शन घडते।

११ हरिश्चंद्रेश्वर मंदिर 

१२ 
तारामती शिखरावर  एक उत्तुंग भगवा फडकवून आम्ही परतीचा प्रवास सुरु केला,,,,,
१३ तारामती शिखरावर एक उत्तुंग भगवा लावताना गडवाटकरी  
पश्चिमेकडील वाटेने पुन्हा कोकणकड़ा डोळ्यात साठवून नळीची वाट दावीकडे ठेवून साधले घटाची वाट तुडवायला सुरु केली, ही वाट नलीसारखी अवघड नसली तरी थकवणारी आहे जंगल संपताच कलाडगड उजवीकडे ठेऊन एका निमुळत्या खिंडीपाशी पोहोचलो. नळीच्या वाटेसारखेच दोन्ही बाजूला खडे पाषाण, काही साधे patch पार करून घात तर उतरलो पण नंतर बेलपाडा हे गाव मृगजळा प्रमाणे भासू लागले, कित्येक मैल रान तुडवला तरी गावाचा मागमूस लागत नव्हता. हरिश्चंद्रची दाहकता इथे स्पष्ट होते.
बेलाग आणि अफाट या शब्दांतही अचूक पकडणे या गडाला शक्य नाही , मग केव्हातरी ४ वाजता गावात पोहोचलो व एक भला मोठा ट्रेक संपत आला होता. सह्याद्रीतून परतताना अंत:करण जड होत होते, खूप काही शिकऊन अनुभव देऊन सह्याद्री पुन्हा एकदा खुणावत होता, याच विचारचक्रात असतानाच समोर आलेल पिठलं भाकरीच ताट कांद्यासह कधी फस्त झालेलं समजलाच नाही !!!



१४ साधले घाटातील एक कातळी दृश्य 






१५

व सरतेसामयी कोकणकड्याला राम राम ठोकून  गाड्या चालू केल्या व वेल्हिवरे-मोरोशी-टोकावडे-मुरबाड-कल्याण-ठाणे-मुंबई पोहोचलो एकदाचं !!!!
RIDERS 
       संयमी  वाचनाबद्दल धन्यवाद :) :) 

Lords - The revenge

                Lords - the revenge             तब्बल 2 महिने बाईक चालवून मी लंडन ला पोहचलो. 2 दिवस स्थिरस्थावर झाल्यावर मी लगेचच लॉर्ड क्रि...