कळसुबाई-एक सर्वोच्च अनुभव - (खंड-२)

   भाग १ साठी
 चालू होती मध्ये मध्ये लोखंडी शिड्या मार्ग सोपा करत वर घेऊन जात होत्या. विक्रांत सुहास सुरज विलासदादा  आबा नेह्मीप्रमने आघाडीवर होतेच. राहुल न. व मल्हार (शिवकवी) यांची चौफेर फोटोग्राफी चालू होतीच…राजू सर शांतपणे सर्व एन्जोय करत होते. मधेच विठ्ठल कोणत्यातरी कड्यावर वा एखाद्या उतरावर pano च्या नादात असलेला दिसायचा. भलताच हुरहुन्नरी पोरगा तो ;* ;* :* :* :*मी संतोष संकेत निलेश राहुल मध्ये मध्ये बसत उठत हसत मार्गक्रमण करत होतो . न most imp म्हणजे आम्ही कळसुबाई चा ला कळस गाठण्याआधीच कल्पेश भाऊंच्या गमतीजमतीने कळस गाठलेला… खूपच खेळकर व्यक्तिमत्व. त्यांच्या गमती जमती पाहत आम्ही एका टप्प्यावर पोहचलो तिथे एक छोटेखानी हॉटेल व एक बावडी होती जर आराम करून वाट धरली.. धुक्याची दुलई पांघरून शिखर अजूनही अदृश्यच होते. मधूनच पावसाची हलकी सर येउन गेली, जाता जाताच सुहास सोबत ''महाराष्ट्राचा अद्यगिर्यारोहक कोण?'' या विषयावर परिसंवाद करत असतनाच आम्ही शिखराच्या अगदीच नजीक आल्याचे लक्षात आले सुहास म्हणजे एक स्थितप्रज्ञ माणूस('स्थितप्रज्ञ' साठी शब्दकोश पाहावा ).
इतक्यात चिन्मयीला एक सर्प दिसला सुहास ने ''बांबू वयपर' अशी त्याची ओळख करून दिली. आणखीही  एक साप दिसला होता पण त्याची ओळख पटण्याअधीच तो त्याच्या ओळखीच्या जागी जाऊन लपला । धुक पाऊस थंड वारा अंगावर घेत निसर्गाची विविध रूपे अनुभवत आम्ही शेवटची शिडी चढलो न महाराष्ट्राच्या सर्वात उंच जागेवर पाय ठेवला…ढगांच्याही वर गेल्याचा तो अनुभव होता. जेमतेम ५०  फुटाचा   घेर असणाऱ्या त्या जागेवर कळसुबाईचे   छोटेखानी मंदिर होते. बाजूला एक साखळदंड खाली सोडला होता नवस पूर्ण करण्यासाठी त्याचा वापर होतो अशी माहिती सुहास ने पुरवली होती.
              वरून सर्व धुक्याचे साम्राज्य पसरले होते.सुहास माहिती सांगत होताच, त्याचे भौगोलिक पांडित्य अगाध.,त्यामुळेच केवळ वर्णनावरून आजूबाजूला दिसत नसणाऱ्याही  किल्ले/डोंगर यांची चित्रे आमच्या डोळ्यासमोर उभी राहिली होती, धुक्यामुळे छायाचित्रकार जरा नाराजच होते. सह्याद्रीच्या त्या देखण्या अरस्पानी सौदर्याला कोणाची नजर नको लागायला यासाठीच बहुधा ती धुक्याची धडपड असावी. मध्ये मध्ये धुके जागा देत होते आणि क्षणभरात पुन्हा त्याचेच अस्तित्व. नखशिखांत सजलेल्या नववधूचा हलकासा चेहरा पदारडून दिसावा क्षणात तिने मान वळवावी अशीच काहीशी आमची न निसर्गाची जुगलबंदी चालू होती. तो मोह आवरून आम्ही खाद्यसंस्कृतीकडे वळळो गडवाट सोबत अशी गडावर क्केलीली न्यहारी नेहमीच विलक्षण ठरलेली असते. विविध प्रकारचे दहा एक पदार्थ तोंडाला लागले. त्यात १५४६  फुट उचीवर शेजवान राइस उपलब्ध करून देणारी चिन्मयी अलौकिकच :) :) ;)तो भरगच्च्च कार्यक्रम आटोपला न् संतोष जाधव साहेबांच्या खर्ड्या आवाजातील गारदीने अंगावर शहरे आणले. _/\_     
                                  १२ :४५ झाले होते परतीची वाट धरली झपाझप  उतरू लागले सर्व. हा एक गोष्ठ राहिली आमच्या सोबत एक द्विसद्स्सीय श्वानपथक पण होते त्यांच्यासाठी या चार ओळी अर्पण- 
                                      या उपेक्षित जीवाला माणूस
                                     पदोपदी हेटाळत असतो
                                        तो मात्र वेडा जीव  जागोगागी
                                     आपला स्वभावधर्म पाळत असतो

     -असो.आम्ही उतरत होतो समोर द्विपाद प्राणी एका रांगेत उतरत होते दिसायला ते छानच होते. काही जोशात तर काही मंद चिन्मयीची चाल जरा मंदावलीच होती(राइस मुळे) गोडसे काकाही तरुणाला लाजवेल अशा उत्सहे सामील झाले होते.
आणि हो राहुल गहरवाल व संतोष यांनी एक स्तुत्य
उपक्रम राबवला होता त्यानी वाटेल आढळलेला सर्व प्लास्टिक कचरा खाली आणून टाकला. याकामी त्याला रोहिणी व चिन्मयीने मौलिक साथ दिली..
निम्मी उतरण झाल्यावर आबासाहेबांच्या लक्षात आले वेळेत गणित चुकतंय मग काय त्यांनी ते साधण्यासाठी एक मोहीमच हाती घेतली। मागे राहून(मागून लीड'' मल्हारच्या भाषेत) सर्वाना झाडून  खाली घेऊन आले. त्यांच्या या बाबतीतल्या आक्रमक धोरणांपुढे आमचे आराम/बसत/उठत य्रणे असे मनसुबे पायदळी तुडवले गेले. परिणामस्वरूप आम्ही वेळेच्या अधीच पंगतीला हजर. जेवण करून पटापट बसमध्ये बसलो जवळील रंधा धबधबा पाहण्याचे धावते नियोजन झाले होते,बस चालू झाली जेवणामुळे आलेल्या  स्पुर्तीत म्हणा किवा सुस्तीत म्हणा विक्रांत सारख अवाढव्य मावळा मागे राहिल्याचे कोणाच्याच लक्षात नाय आले. :p बारी ते रंधा २० मिनिटच अंतर सुस्तीत जाणार असाच वाटत होते तोच कल्पेशभाऊ dhaun आले त्यांच्या अकल्पित नृत्याविष्काराने आमचे येथेच्छ मनोरंजन झाले त्यांना सर्वांचीच साथ लाभली.राजू सर फटफटी(हल्ली बाईक म्हणतात)वरून असल्याने ते याला मुकले. रंध धबधबा  आला. माझे धबधब्याबद्दलचे सर्व अंदाज कल्पना धाब्यावर बसवुन हा रंधा धबधबा खालून खाली कोसळत होता. सौदर्याची पुन्हा एकदा उधळण दिसत होती. ते दृश्य पाहताच आमचे फोटोग्राफर्स सर्वत्र बागडले. प्रत्येक जन आपल्यचं नादात होता वाहवा,चर्चा,फोटो,पोझ या धामधुमीतच रोहिणीच्या पायाला एक लोखंडी गज लागला. सर्वानीच पाहिल्यामुळे तिचा चेहरा केविलवाणापणाची शिव ओलांडून रडकुंडीच्या राज्यात केव्हाच गेला होता. :p पण चावरे बाबा आले म्हणता क्षणी  ती सर्व विसरून दाणादाण पावले टाकायला लागली.  आबासाहेबांच्या एका हाकेसरशी सर्वजन एका मिनटात गाडीत जमले. पुढचा प्रवास दणक्यात सुरु.मला काही शवासनाचा मोह आवरला नाही.मध्ये कुठेतरी बस लघुशंकेला ठ्माबली थांबली न् मला जग आली. अर्धनिद्रिस्थ असतानाच मल्हार ने शांकात्मक आरोप केले(लघुशंका केल्याशिवाय याच्या शंकेला उत्तर सुचणार  नव्हते) त्या अनुषंगाने मग एक चांगलेच वैचारिक/जातीय/धार्मिक/वांशिक असे बहुद्देशीय चर्चासत्र घडून आले, त्याचे फलित म्हणून म्ह निलेश(सत्ता) याचा माझ्याबद्दल असणारा कट्टरते बद्दलचा (गैर)समाज दूर झाला, मल्हार च्या शंकांना उत्तर मिळाले. रवींद्र सावंत ने आपले जातीय/आंतरजातीय सूक्ष्म निरीक्षणे मांडली. तोच ठाणे आले न प्रमुख चर्चे करीउतरले व एक इप्सित सध्या केल्याच्या आनंदात घरी गेले. गाडीत चार टाळकी उरली होती. दादर आले. वेळेच्या २ /३ तास उशिरा येणारे कार्ट  ९ लाच दरवाजासमोर उभ दिसल्याने घरच्यांचा त्यांच्या पर्सनल डोळ्यांवरही विश्वास बसेना,पुढच्याच क्षणी स्वताला सावरत खातरजमा करून आत घेतल। व मी पुन्हा कुठ जायचे हा विचार करत नकाशा उघडला… 


समाप्त…    
kalasubai / कळसुबाई भाग १ साठी


Comments

Popular posts from this blog

।। भटकंतीची पूर्व तयारी ।।

शाळा- मंतरलेले दिवस

झपाटलेला ट्रेक