Posts

बदलाचे वारे

Image
बदलाचे वारे.  वयाच्या 19 व्या वर्षी, मी 2009 ला मुंबई ला गेलो, कॉलेज, जॉब, बिजनेस हे सर्व सेट करण्यात 10 वर्षे कशी गेली कळलं ही नाही. या काळात चार दोन महिन्यांनी मी गावी यायचो पण गडबडीत असायचं सर्व. 4 दिवसांत परत जोखड खांद्यावर घ्यायला मुंबई ला रवाना.  आता 4 महिने गावी आहे. कोरोनामुळे सर्व जग ठप्प आहे, कोरोनाने सर्वांची वाट लावलीय. सर्वांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालंय. मी पर्यटन व्यवसायात, आमच्या फिल्ड चे तर सर्वात जास्त आणि दूरगामी नुकसान झालेलं आहे. लाखोंचं नुकसान भोगून ही कोरोनामूळे मला 4 महिने निवांत जगता आले म्हणून कोरोना ला मनाच्या एका कोपऱ्यातून थँक्स म्हणणारा मीच असेल. कोणीही ठरवून असे 4 (किंवा 5 6 ही) महिने सर्व व्याप सोडून  आयुष्यात कधीच थांबणार नव्हता. निवांतपणा अनुभवणार नव्हता. कोरोना ने सक्ती ने ते दिलंय. वाईटातून चांगले.         या 4 महिन्यात मी खूप निरीक्षण केले, गावाचे, गावातील लोकांचे, समाजातील बदलाचे, निसर्गाचे, त्यांच्यातील बदलाचे, पशुपक्षी यांचे. शेती चे. तर मी आज शेती मधील बदल अनुभवलेले आणि निसर्गचक्र कसं बिघडले त्यावर केलेलं निरीक्षण लिहत आहे.

लिंगाण्याचा समाचार

Image
लिंगाण्याचा समाचार लिं गाणा !!! सह्याद्रीतील एक अजब रसायन. या एका शब्दाची व्याप्ती तोच जाणू शकतो ज्याने सह्याद्रीत पोटभर भटकंती केलीय आणि डोकंभर मराठ्यांच्या  इतिहासाचा अभ्यास केलाय. त्यास अधिक सांगणे न लगे. एक मानबिंदूच. प्रत्येक ट्रेकर चे स्वप्न असतंच एकदातरी लिंगाण्याच्या माथ्यावर पाय ठेवावा. तास हि माझ हि होतच परवाच ते सत्यात उतरलं... ! लिंगाण्याची  अभेद्यता पाहावी ती रायलिंग वरून व रायगडाची भव्यता पहावी ती लिंगाण्यावरून च. असा हा मोक्याच्या जागी उठवलेला गगनचुंबी अभेद्य सुळका वजा किल्ला, किल्ले लिंगाणा _/\_ TEAM ULTIMATE _________________________________________________________________________________ हा तर झालं असं कि १७ मार्च २०१७ ला गंगटोक च्या MG रोड वर फेरफटका मारत असतानाच विषांत चा फोन आला ९ एप्रिल २०१७  रोजी देवा घाणेकर च्या नेतृत्वाखाली आग्याबॉईज मंडळ लिंगाणा करतंय आणि तुला यायला लागतंय. आता लिंगाणा ट्रेक ला नकार देण्याएवढं धाडस माझ्या अंगी नसल्याने आपसूकच कोणत्याही विचारांती होकार गेला. आणि मी ही ३ एप्रिलला महाराष्ट्रात पोहोचत होतो. गंगटोक च्या MG  मार्

🔸रात्रीचा माणिकगड🔸

Image
 🔸रात्रीचा  माणिकगड🔸  माणिकगड म्हटल की त्या किल्ल्यावर वळसा मारुन  जाणारी पायवाट आणि मुख्य वाटेला फुटलेल्या अनेक छोट्या छोट्या वाटा.त्यामुळे ह्या किल्ल्यावर जाताना बरोबर गावातील एखादा वाटाडया नसेल तर दिवसादेखील चढ़ाई करण तस जोखमीचच काम. अश्या ह्या माणिकगडावर आपला   अल्टीमेट हायकर्स  ग्रुप ११ जणांना  घेऊन  रात्रीची चढ़ाई करण्यास सज्ज झाला होता.नियोजीत वेळेनुसार वाशिवली ते ठाकुरवाड़ी(आदिवाशी पाडा) हा पहिला टप्पा पार करुण आम्ही सगळे 'मधु' काकांच्या घरी जेवणाच्या वेळेत पोहचलो. अंगणामध्ये बसून गरमागरम वरणभात,वाटाणा व शेवग्याच्या शेंगांची भाजी,पापड,लोणच अस परीपूर्ण शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेतला. ह्या दिवसात गडावर पिण्यायोग्य पाणी नसल्याने 'मधु' काकांच्या घरुण उद्या दुपारपर्यंत पुरेल एवढा पाणी साठा घेवून पुढील प्रवासासाठी सज्ज मोर्चे बांधणी झाली .     काळ्याकुट्ट अंधाराला चिरत टॉर्चच्या प्रकाशात आम्ही सगळे किल्ल्याच्या दिशेने निघालो.आमचा वाटाडया म्हणजे आमचा मित्र 'समीर पार्टे' हा लीड करत होता.आणि त्याच्या मागे आम्ही सगळे तो नेईल तिकडे निघालो होतो.तर आमचा लीडर

काश्मीर 370 आधी आणि नंतर.

Image
काश्मीर  370  आधी   आणि   नंतर . 370  कधी   घटनेत   घातलं   गेले   का   अस्तित्वात   आले .  हे   एव्हाना   सर्वांना   माहिती   झालेच   असेल . 370 कलम   काय   होते   तर   सोप्या   भाषेत   सांगायचे   झाले   तर   भारतीय   संविधानापासून   अलिप्त   ठेऊन   काश्मीर   ची   स्वायत्तता   टिकून   ठेवणारे   कलम .  भारतीय   संविधानानुसार   भारत   सुरक्षा ,  दळणवळण  , आणि   परराष्ट्र   व्यवहार   ई .  गोष्टीच   काश्मीरमध्ये   करू   शकत   होता . आणि   सोबतच   काश्मीर   च्या   वेगळ्या   घटनेला   मान्यता   ही  370  कलम   देत   होते .  आणि   यात   मेख   अशी   होती   की  370  कलम   हटवायला   जम्मू   काश्मीर   विधानसभेत   चर्चा   आणि   मान्यता   मिळाल्याशिवाय   संसद   हे   कलम   हटवू   शकत   नव्हते . आणि   जम्मू   काश्मीर   विधानसभा   हे   कधीच   होऊ   देणार   नाही .  त्यामुळे   काश्मिरी   नेते   अतिआत्मविश्वासात   होते   की   मोदी  10  वेळा  pm  झाला   तरी  370  ला   स्पर्श   पण   करू   शकत   नाही . आता   भाजप   पूर्ण   बहुमताने   सत्तेत   आलेले   आणि   जाहीरनाम्यातही   ही   गोष्ट   होतीच .